सातारा जिल्हा पश्चिम अंतर्गत सर्व तालुक्यांत वर्षावास मालिकेस मंगलमय वातावरणात सुरुवात !

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा पश्चिम जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाविहार येथे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात वर्षावास मालिकेस मंगलमय वातावरणात सुरुवात करण्यात आली.

           यावेळी माजी जिल्हाध्यक्ष व्ही.आर.थोरवडे,भिमराव गायकवाड (गुरुजी),जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे,माजी सरचिटणीस सुनील सकपाळ, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन आढाव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

               महाविहार,कराड येथून आगाशिव लेणी,कराड असा प्रवास करण्यात त्यात असताना अतिशय मुसळधार पावसामुळे आगाशिव लेणीच्या पायथ्याशी खऱ्या अर्थाने औपचारिक वर्षावास मालिकेस सुरुवात करण्यात आली.याच दिवशी जिल्ह्यातील सातारा,कराड, पाटण, जावळी, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील सर्वत्र वर्षावास मालिकेस सुरुवात  झाली आहे.यावेळी सर्व पदाधिकारी यांनी बहुमोल परिश्रम घेऊन वर्षावास मालिका जिल्ह्यातील ६० ठिकाणी एकाच वेळी सुरू करुन संपूर्ण जिल्ह्यात मंगलमय वातावरण निर्माण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here