
गजानन पाटील आवारे
पैठण,दिं.६ : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद औरंगाबाद यांचा संयुक्त उपक्रम, जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यक्रम संत एकनाथ कार्यालय येथे बुधवार (दिं.५) रोजी संपन्न झाला.
चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद, ग्रामसभा,सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती मिळणार संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणाचे डि.के.गोर्डे यांची माहिती.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद औरंगाबाद यांचा संयुक्त उपक्रम, जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रयत्नातून , व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत एमआयडीसी पैठण पोलीस स्टेशन येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे आपत्तकालीन हेल्पलाइन 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, नामदेव कातडे, पोलिस जमादार राजेश चव्हाण,कर्तारसिंग सिंघल, गोपनीय शाखेचे पोलिस कर्मचारी कृष्णा उगले, राहूल मोहोतमल,कोलते, दिनेश दाभाडे,
गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी, मकरंद कदम ग्राम सुरक्षा यंत्रणा विभागीय अधिकारी यांच्या सह एमआयडीसी पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव, अशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, एमआयडीसी पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संयोजन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी केले.
——–
चौकट
ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यान्वित करण्यासाठी 50 रुपये प्रति कुटुंब, प्रति वर्ष इतका खर्च येणार आहे. सदर खर्चाची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद करणेबाबत निर्देश जिल्हा परिषद कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना देण्यात आलेले आहेत.
गेल्या 13 वर्षांत पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील 4500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.