सातारा : पाटण तालुक्यातील सोनवडे व वाई तालुक्यातील भुईंज येथील प्रत्येकी दोन महिलांना पत्रकारांनी कडक लिहिल्याने न्याय मिळाला आहे.अशा कडक शब्दातच ऑल इंडिया पँथरचे जिल्हाध्यक्ष गरुडा ग्रुपचे आदित्य गायकवाड यांनी व्यक्त करून आभार मानले आहेत.
सोनवडे येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर नागेश ननावरे व अभिषेक डूबल यांनी सौ.गौतमी शशिकांत पाटील यांच्यावर चुकीची शस्त्रक्रिया केली होती. भुईंज येथील वरिष्ठ असणारे डॉक्टर श्याम गीते यांच्याबाबत डॉ.मंदा संकपाळ यांची तक्रार होती.या दोघीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू होते.