पैठण,दिं.२०:
पैठण येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने ‘हात से हात जोडो’ अभियान संदर्भात आढावा बैठक औरंगाबाद जिल्हा प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस मुजाहिद खान, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ कल्याण पा काळे, माजी राज्यमंत्री तथा प्रदेश सरचिटणीस अनिल पटेल ,काँग्रेस सेवा दल प्रदेश अध्यक्ष विलास औताडे,जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोनगावकर ,महापालिका गटनेते भाऊसाहेब जगताप,सचिव राहुल सावंत ,मराठवाडा ओ बी सी अध्यक्ष कंचनकुमार चाटे ,महिला जिल्हा अध्यक्ष हेमाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राहुलजी गांधी हे आज भारत जोड यात्रा निमित्त सर्व सामान्य माणसांना भेटत असून महागाई ,बेकारी ,शासकीय यंत्रणेचा गैरवापर या बाबत बोलत आहे.जिल्हाध्यक्ष डॉ कल्याण काळे यांनी हात से हात जोडो अभियान बाबत सविस्तर माहिती दिली.महिला जिल्हा अध्यक्ष हेमताई पाटील यांनीही भाषण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विनोद पाटील तांबे यांनी केले तर आभार युवानेते तथा शहराध्यक्ष निमेश पटेल यांनी मानले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती मोहम्मद हनिफ,माजी नगरसेवक रफिक कादरी,किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदकिशोर नजन, माजी नगरसेवक फाजल टेकडी,अनु.जाती विभागाचे समनव्यक रावसाहेब नाडे,हमीद खान,महिला तालुकाध्यक्ष सविता साळुंके,शहराध्यक्ष सविता पवार,बांगर ताई,महेश पाटील पवार(नाना),ओबीसी शहराध्यक्ष अजय करकोटक,योगेश जोशी,अनु जाती जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष अनिल मगरे,युनूस पठाण,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी काटे,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल काळे,अनु जाती जमाती विभागाचे शहराध्यक्ष कल्याण मगरे,सेवादलचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण,ऍड.रमेश गव्हाणे,युवक शहराध्यक्ष योगेश शिपणकर,इम्रान पठाण,गोविंद पहिलवान,दीपक खनसे,भीमा नवगिरे,बबरु कदम,अल्पसंख्याक शहराध्यक्ष जुनेद गाजी,रमेश मुळे, अजय पाखरे,बाबासाहेब पठाडे,दिनेश माळवे,दादू पटेल यांच्यासह पैठण व तालुका काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.