संगमनेर : मुळच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दच्या व सध्या अहमदनगर शहरात स्थायिक झालेल्या सौ.रंजना बबनराव गायकवाड (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी, जावई, चार दिर,जावा, पुतणे, पुतण्या,नातवंडे असा मोठा परिवार आहे. अहमदनगर येथील प्रसिध्द चार्टर अकांऊटंट बबनराव गायकवाड यांच्या त्या पत्नी तर पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ.दिनकर गायकवाड़, आश्वी खुर्द सेवा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल गायकवाड,रंगनाथ गायकवाड,राधाकृष्ण गायकवाड यांच्या भावजयी तर डॉ.गणेश गायकवाड यांच्या त्या चुलती होत.