सातारा/अनिल वीर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे श्रावण बाळ योजनेबाबत राजरतन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले आंदोलन स्थगित केले आहे.
येथील तहसीलदार व संबंधित अधिकारी रु.२१ हजार असणारे उत्पन्नाचे दाखले देत नाहीत. त्यामुळे श्रावण बाळ योजनेचा बोजवारा उडालेला आहे.संयुक्त रेशन कार्डावर योजनेतील लाभार्थ्यासह त्यांच्या मुला-बाळांची नावे आहेत.त्यामुळे दाखले मिळण्यास अडथळा येत आहेत.मुले-बाळे मोल-मजुरी करीत आहेत.ते सांभाळत असले तरी औषध-पाण्यासाठी योजनेचा लाभ होत असतो. आता श्रावण बाळ योजना बंद झाल्याने जगणे मुश्किल झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.याबाबत संबंधितांनी दखल घेतल्याने आंदोलन स्थगित केले आहे.तेव्हा सदरची योजना पुन्हा चालु करावी.अशी आर्त हाक लाभार्थी करीत आहेत.