सातारा : पायांनी चालतो तो प्रवास, मनानी चालतो ती यात्रा व हृदयातून चालते ती वारी ….. वेण्णानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने माऊलींचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांनी विठू माऊलीचा वेशभूषा करून सर्व गावात मिरवणूक काढण्यात आली.सर्व माऊली भक्तांना त्याचा आनंद व दर्शनाचा लाभ घेता आला.यामुळे गावात पंढरी नगरीत तयार झाल्याचा भास सर्व माऊली भक्तांना झाला.दिंडी सोहळ्यामुळे विठू माऊलीचे दर्शन घडल्याने मोठा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला.दिंडी सोहळ्यामुळे कायमची दिंडी मिरवणूक ही परंपरा अशीच कायमस्वरूपी चालू रहावी.असे सर्वजणांना वाटू लागले.विठू माऊलीच्या अभंगात गाजावाजा करत दिंडी गावात दिंडी भक्तिभावाने संपन्न झाली.यावेळी मुख्याध्यापिका सौ.वैशाली वीर,सौ.रुपाली वाघ,सौ.वैशाली कडव,शाळा, अंगणवाडी,पालक, ग्रामस्थ व अध्ययनार्थी उपस्थीत होते.