अनिल वीर सातारा : मनगट आणि मेंदू जर बळकट करायचा असेल तर शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय क्रीडा स्पर्धा हे त्यांच्यासाठी खुले व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन केंद्रप्रमुख दत्तात्रय बाचल यांनी केले.
मत्रेवाडी केंद्राच्या स्व.यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा निवी, ता.पाटण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी उद्घाटनप्रसंगी बाचल बोलत होते. सदर स्पर्धेच्या वेळी केंद्रातील सर्व शाळेचे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते. मत्रेवाडी केंद्राच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक व नंतर सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्वागत जोशी यांनी केले तर आभार नारायण पाटील यांनी मानले.