संगीत ही कला व्यक्तिला आनंददायी परिपूर्ण जीवन देते: काका पाटील

0

अनिल वीर सातारा : संगीत ही एक कला असून ती प्रत्येकाने आत्मसात करावी  तसेच त्यासाठी साधना करावी. असे प्रतिपादन काका पाटील यांनी केले.

             येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आयोजित गुलदस्ता या  रंगारंग  सदाबहार हिंदी व मराठी गीतांच्या मैफिलीत उद्घाटनपर पाटील यांनी काढले.यावेळी डॉ. कामिनी पाटील, सुरेखा शेजवळ, काका पाटील, शिरीष चिटणीस अनिल वाळिंबे, रमेश वेलणकर, विजय साबळे, डॉ. सुनील पटवर्धन आदि मान्यवर उपस्थित होते.

              काका पाटील म्हणाले, “गुलदस्ता या मैफिलीमध्ये प्रत्येक गायक कलाकाराने उत्कृष्ट गायन केले आहे. या क्लबच्या सीनियर  गायकांनी तर अप्रतिम गाणी गायली असून नवोदित कलाकारांनी सुद्धा आपल्या प्रतिभेची छाप रसिक श्रोत्यांच्या मनावर पाडली आहे. याचे सर्व श्रेय विजय साबळे यांना जात असून ते प्रत्येक गायक कलाकाराला सूट होईल असेच गाणे गायचा सल्ला देतात. या ग्रुपमध्ये सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आपल्या गाण्याची कला जोपासण्यासाठी येत असतात.”  

           शिरीष चिटणीस म्हणाले, “सध्या देशामध्ये कराओकेचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांसाठी होत आहेत. त्यातून समाजाला प्रेरणा व दिशा देण्याचे  काम अविरत चालू आहे. संगीत जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे  मन प्रसन्न होते. एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते.”    अनिल वाळिंबे म्हणाले, “जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी होतो.तसेच मन प्रसन्न  राहते.  आजही अनेक जुने  गीते रसिक श्रोत्यांना भुरळ घालतात.” कार्यक्रमाचे दीपप्रजनन करून उद्घाटन डॉ.कामिनी पाटील,सुरेखा शेजवळ,काका पाटील,रमेश वेलणकर,विजय साबळे, अनिल वालिंबे,शिरीष चिटणीस,डॉ सुनील पटवर्धन आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.

 

गीत मैफिलीमध्ये हिंदी व मराठी प्रेम गीत, विरह गीत, सोलो गीत, ड्युएट गीत, गझल,फर्माईश तसेच इतर गीत प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मंजुषा पोतनीस यांच्या “आपकी नजरोने समझा या सुमधुर गीताने झाली  यानंतर  मैफिली मध्ये   मिलिंद हर्षे ” जीवन से भरी तेरी आँखे” बापूलाल सुतार यांच ” दिल का सूना साज ” ममता नरहरी ” रंग दिल की धडकन  भि लाती तो होगी ” कला चंद ” बाहो मे चले आओ ” सुषमा बगाडे ”  ये राते नयी पुरानी ” उमाकांत पाटील “आपके अनुरोध पे ” उद्धव इंगवले ” छूकर मेरे मन को ” दिपाली घाडगे ” सून साहिबा  सून प्यार की धुन ” यासारख्या गीतांना रसिक श्रोत्यांच्या पसंतीची पावती मिळाली.यानंतर नागेंद्र पाटील यांचे,”जाने क्या सोच कर नही गुजरा ” उमेश खोले “कही दूर जब दिन ढल जाये ”  चंद्रशेखर बोकील ” मानो हो तुम बेहद हसी ” विठ्ठल जाधव ” एक हसी शाम को दिल मेरा खो गया” अरुण नाझरे ” हम बेवफा हरगिज ना थे ” शुभांगी मुरुडकर ” बिंदिया चमकेगी ” इंद्रायणी कुलकर्णी ” रहे ना रहे हम ” यासारख्या गीतांनी कार्यक्रमाची उंची वाढवली.डॉ. सुनील पटवर्धन ” हुस्न वाले तेरा जवाब नही ” व वनिता कुंभार यांच्या ” गोऱ्या गोऱ्या गालावरी ” तसेच उमाकांत पाटील व मंजिरी दीक्षित ” ये राते ये मौसम नदी का किनारा ” यासारख्या हृदयस्पर्शी गीतांना वन्स मोर मिळाला. ड्युएट गाण्यांमध्ये विजय साबळे व सुषमा बगाडे  यांचे अजरामर गीत ” लुटे कोई मन का नगर” डॉ. सुनील पटवर्धन व वनिता कुंभार ” ये मैंने कसम ली ये तुने कसम ली” शिरीष खुटाळे व मंजिरी दीक्षित ” जो भी बुरा भला है अल्लाह जानता है” ही अप्रतिम गझल सादर केली.विजय साबळे व इंद्रायणी  कुलकर्णी ” धीरे धीरे बोल कोई सून ना ले” “डॉ.सुनील पटवर्धन व मंजिरी दीक्षित ” तेरे चेहरे से नजर नही हटती” चंद्रशेखर बोकील व मंजुषा पोतनीस ” ओ रात के मुसाफिर ” नागेंद्र पाटील व दिपाली घाडगे ” पन्ना की तमन्ना है कि ” कला चंद व मिलिंद हर्षे “तेरे मेरे मिलन की ये रैना ” डॉ.सुनील पटवर्धन व मंजुषा पोतनीस ” तुम्हारी नजर क्यो खफा हो गई ” तसेच ऐश्वर्या गव्हाणे गेस्ट परफॉर्मन्स गीत “अजीब दास्ता है ये कहा शुरु कहा खतम ”  यासारख्या डुएट व  फर्माईश गीतांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचा शेवट 

विजय साबळे यांच्या मनमोहक ” भुली हुई यादो मुझे इतना ना सताओ ” या गीताने झाला. संकल्पना व नियोजन विजय साबळे यांनी केले होते. अक्षता शेवडे यांची ध्वनीव्यवस्था लाभली होती. निवेदन बापूलाल सुतार यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास संगीत, साहित्य, कला, नृत्य, आर्थिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here