कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे – आ.आशुतोष काळे

0

गोधेगाव येथे मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी – शेतकरी अडचणीत आहेत. पावसाळा  सुरु होवून येत्या काही दिवसात तीन महिने पूर्ण होतील परंतु अद्यापही कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून काहीसा दिलासा मिळाला असता. परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत सर्व रोग निदान शिबिराचे’ उदघाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे होत्या.

यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविल्यास वाढदिवसाचे खरे खुरे समाधान मिळते. अशा मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून विविध आजारांचे वेळीच निदान होवून पुढे उद्भवणारा धोका टाळता येतो.या शिबिराच्या माध्यमातून श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांकडून मेंदूचे आजार, युरो सर्जरी, हृदय विकार, जनरल सर्जरी, स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार, कॅन्सर आदी आजारांची मोफत तपासणी, मार्गदर्शन व ज्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियांची गरज भासल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या निमित्ताने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून हॉस्पिटलच आपल्या दारी आले असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना सौ. पुष्पाताई म्हणाल्या की, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु असून समाजातील गरजू महिलांची सखी म्हणून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आपली जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी गोदाकाठ महोत्सव, महिलांना छोट्या-मोठ्या उद्योगांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, वित्त पुरवठा असे उपक्रम राबविले जात आहे. परंतु संसाराचा गाडा हाकतांना महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे अनेक व्याधींचा होणारा त्रास सहन करतात. त्यामुळे अशा मोफत सर्व रोग निदान शिबिराच्या माध्यमातून महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून आपली काळजी घ्यावी असा मौलिक सल्ला दिला.

यावर्षी अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांदा काढल्यानंतर तो टिकणार नसल्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कांदा विकावा लागला. यातून चांगल्या प्रतीचा जो काही कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला त्यातीलही बराच कांदा खराब झाल्यामुळे कांद्याची टंचाई निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा खाणाऱ्यांचा विचार करून ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु केंद्र सरकारने कांदा खाणाऱ्यांबरोबर कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विचार करणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि हिताच्या दृष्टीने सरकारने कांदा निर्यातीवर लावलेल्या ४० टक्के शुल्क निर्णयाचा फेरविचार करावा. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि कांदा खाणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी येणार नाही. यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असुन त्याबाबत केंद्र सरकार निश्चित फेरविचार करेल. – आ. आशुतोष काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here