कोल्हे परिवाराचे ऋण मुस्लिम समाज कधीही विसरणार नाही; मुस्लिम समाजातील मान्यवरांच्या भावना
कोपरगाव : संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक बिपीनदादा शंकररावजी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील मौलाना मुनीर अहमद उर्दू प्राथमिक विद्यालय व हायस्कूलमधील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मंगळवारी (४ जुलै) मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब तसेच बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी मुस्लिम समाजाला नेहमीच संकटकाळात मदत करून त्यांचे विविध प्रश्न सोडवून न्याय दिला आहे. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सदैव सहकार्य केले आहे. मुस्लिम समाज कोल्हे परिवाराचे हे ऋण कदापिही विसरणार नाही, अशा भावना रियाज शेख, शफिकभाई सय्यद, अकबरभाई शेख यांनी यावेळी व्यक्त केल्या.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटपासारखे उपक्रम राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार मागील २०-२२ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, मंगळवारी (४ जुलै) शहरातील मौलाना मुनीर अहमद उर्दू प्राथमिक विद्यालय व हायस्कूलमधील गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद राक्षे होते. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक गोपीनाथ गायकवाड, माजी नगरसेवक अल्ताफभाई कुरेशी, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, इलियासभाई शेख, शफिकभाई सय्यद, एस. पी. पठाण, हाशमभाई पटेल, रहीमभाई शेख, भाजप किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, प्रमोद नरोडे, संतोष साबळे, सचिन सावंत, चंद्रकांत वाघमारे, अकिश बागवान, सादिक पठाण, मौलाना मुनीर अहमद उर्दू हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक रियाज शेख, अकबरभाई शेख, अहमदभाई शेख, मुख्याध्यापिका महेबीन रफिकभाई शेख, शिक्षक इलियास इब्राहिम शेख, अबरार जुबेर पठाण, मकसूद अहमद शेख, अयुब खान, मुख्तार शेख, श्रीमती शबाना सलीम सय्यद, फरहाद असलम शेख, आशिया इब्राहिम शेख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक रियाज शेख यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
शफिकभाई सय्यद म्हणाले, मुस्लिम समाजबांधवांचे स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांवर विशेष प्रेम होते. स्व. कोल्हेसाहेबांनी आमदार, मंत्री असताना मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला.
राजेंद्र सोनवणे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा जनसेवेचा वसा कोल्हे परिवार आजही समर्थपणे पुढे चालवत आहे. बिपीनदादा कोल्हे हे विकासाची दूरदृष्टी असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते दरवर्षी आपला वाढदिवस कोपरगाव मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून साजरा करतात.
विनोद राक्षे म्हणाले, मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी, या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांनी भरीव योगदान दिले आहे. तसेच मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यावेळी अकबरभाई शेख यांनी आपल्या भाषणात कोल्हे कुटुंबाने मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गार काढले. सूत्रसंचालन शेख इलियास यांनी केले.