राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक बोलवले जातात का? – राज ठाकरे

0

ही घटना दुःखद असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या.

राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयाला भेट दिली.

उपचार घेत असलेल्या अनुयायांना भेटल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. वातावरण उन्हानं तापलं असताना सकाळी इतक्या लोकांना बोलवायचं. राजभवनावर हा कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. सकाळपेक्षा संध्याकाळी कार्यक्रम झाला असता तर प्रसंग टाळता आला असता.”

राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक बोलवले जातात का? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here