वंचित महिला आघाडीत वाढ करणार : सौ.निर्मलाताई वनशिव

0

सातारा : जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडी जिल्ह्यात वाढ करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन राज्य सदस्या व निरीक्षक सौ.निर्मलाताई वनशिव यांनी केले. सातारा येथे नियोजनार्थ  बैठक पार पडली.तेव्हा सौ.वनशिव मार्गदर्शन करीत होत्या.

   येत्या काही दिवसांमध्ये महिला आघाडीची मोठी कार्यकारणी होणार आहे. त्या संदर्भात नियोजनार्थ बैठक पार पडली. महिला आघाडीची ताकद जिल्ह्यात वाढवायची आहे. म्हणून लवकरच मोठी कार्यकारणी बैठक होणार आहे.असाही पुनरुच्चार सर्वानुमते करण्यात आला.

   यावेळी जिल्हाध्यक्षा सुनंदाताई मोरे, महाबळेश्वर तालुकाध्यक्षा संगीता मोहिते,वनिता उघडे, जिल्हा उपाध्यक्ष चित्राताई गायकवाड,संगीता कांबळे,युवा जिल्हा महासचिव सायली भोसले व कार्यकर्त्या उपस्थीत होत्या. याशिवाय,जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व पदाधिकारी यांच्याही समवेत महिला पदाधिकारी यांनी चर्चा करून आगामी नियोजन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here