हा नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, गरीबांचा विजय- पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

  1. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या हॅटट्रिकनंतर काही लोक म्हणत आहेत की यांनी 2024 मध्येही हॅटट्रिकची हमी दिलेली आहे

नवी दिल्ली : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या लोकांनी भाजपावर भरपूर स्नेह दाखवला. तेलंगणातही भाजपाप्रती समर्थन सतत वाढत आहे. त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो. हे सगळं पाहाता माझी वैयक्तिक जबाबदारी आणखी वाढते अशी माझी भावना आहे. मी आपल्या माता, बहिणी, युवा, मुली, शेतकरी बांधव यांनी जे आम्हाला समर्थन दिलं, त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो. तीन राज्यांत भाजपाला मोठं यश मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना अभिवादन. दिल्लीमध्ये भाजपाच्या मुख्यालयामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले .

या निवडणुकीनं देशाला जातीत विभागण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी सतत हेच सांगत होतो की माझ्यासाठी 4 जातीच मोठ्या आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब परिवार याच त्या जाती. त्यांना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल.

आज आमचे सहकारी आदिवासी आणि ओबीसी मोठ्या संख्येने आहेत. आज प्रत्येक गरीब व्यक्तीला आपणच जिंकलो असं वाटत आहे. शेतकऱ्यांना आपण जिंकलोय असं वाटतंय.आदिवासी भाऊ-बहिणींना आपला विजय झालाय असं वाटतंय. प्रथम मतदान करणारेही माझं पहिलं मत मला विजय मिळवून देणारं ठरलंय असा विचार करत आहेत. आज स्त्रिया आणि युवावर्गही या निवडणुकीत स्वतःचा विजय पाहात आहे. प्रत्येक नागरिक यात स्वतःचं यश पाहातोय.

भाजपाचा झेंडा फडकवणारच या विचाराने नारीशक्ती घराबाहेर पडली आणि त्यांनी संरक्षण दिलं की कोणतीही शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही. प्रत्येक महिलेमध्ये भाजपा सरकारमध्ये त्यांच्या सक्रीय भागिदारीला नवं स्थान मिळणार आहे हा विचार आला आहे. भाजपाच महिलांचा सन्मान, महिलासुरक्षेची सर्वात मोठी गॅरंटी बीजेपीच आहे हे महिलांना समजलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here