मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा माजी खासदार गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्यानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर BCCI नवीन प्रशिक्षकाच्या शोधात होती.मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचं जाहीर केलं आहे.
गौतम गंभीर 2019 साली पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आला होता. पण गंभीरने राजकारणातून निवृत्त होऊन क्रिकेटकडेच पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला यावेळी खासदारकीचे तिकीट देण्यात आलं नव्हतं.आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्याने भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्याकडे केली होती.