बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली

0

फलटण : बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही तडजोड करणार नसल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.
सासवड, ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर बोलत होते.

यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, धनंजय साळुंखे पाटील, संत कृपा डेअरीचे प्रमुख विलासराव नलवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर,

शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अनुप शहा, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष जयवंत केंजळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, लतीफभाई तांबोळी, शंभूराजे बोबडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी धोम बलकवडी लघुवितरिका, सासवड ते माळीबेंद रस्ता, माळी बेंद ते रासकर वस्ती रस्ता, लघुबंधारे, विद्युत पोल, महालक्ष्मी मंदिर संभामंडप व कंपाउंड आदी विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here